पुणे : गेल्या काही वर्षांमध्ये वाहनांच्या वाढत्या संख्येने निर्माण होणारा धूर आणि इमारती, रस्ते यांची लांबलेली बांधकामे यामुळे ऐन उन्हाळ्यातही आता पुण्यात दम्याचे रुग्ण वाढले आहेत. गेल्या काही वर्षात दमा होण्याचे प्रमाण 25 ते 30 टक्क्यांनी वाढल्याचे फुफ्फुस विकार तज्ज्ञांचे मत आहे.त्यामुळे पुणेकरांची चिंता आता वाढली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये शहरीकरण आणि वाहनांचा वाढत्या संख्येमुळे पुण्याची हवा प्रदूषित होत आहे असा निष्कर्ष देखील महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या अहवालातून काढण्यात आला होता. शहरातील वाहनांमुळे वाढलेले वायू प्रदूषण धूळ,परागकण,धूम्रपान व ऍलर्जी यामुळे दमा वाढण्याचे प्रमाण पुण्यात वाढत आहे. यामुळे अनेकांच्या दम्याचे निदान झाले आहे. शहरात दमा होण्याचे प्रमाण 25 ते 30 टक्क्यांनी वाढले असल्याचे विकार तज्ज्ञांनी म्हटल आहे. त्यामुळे आरोग्याचा मोठा गंभीर प्रश्न पुणेकरांसमोर उभा राहिला आहे.