Saturday, May 17, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हा ‘अर्थ’ नसून भांडवलदारांच्या ‘हट्ट संकल्प’ तर काहींनी केले स्वागत ; खटाव तालुक्यातील काही सामान्यांच्या थेट पण ग्रेट प्रतिक्रिया…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 2 February 2023, 17:42

अजित जगताप

वडूज : यंदाच्या २०२३-२४ चा अर्थसंकल्प जाहीर झाला असून सामान्य माणसाची पुन्हा एकदा निराशा झालेली आहे. हा अर्थ नसून भांडवलदारांचा ‘हट्ट संकल्प ‘आहे .अशा शब्दात टीका होऊ लागलेली आहे तर दुसऱ्या बाजूला भाजप नेते व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त करून स्वागत केले आहे.

सध्या अर्थसंकल्पावर खटाव तालुक्यातील निम शहरी भागात चर्चा होताना दिसत असली तरी ग्रामीण भागात पेट्रोल, डिझेल व सिलेंडरच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य माणसाला महागाई वाढण्याची भीती वाटत होती ती खरी ठरलेली आहे.

वडूज येथील हॉटेल व्यवसायिक केदार जोशी यांनी सांगितले की, महागाईने हॉटेल व्यवसाय अडचणीत आला असला तरी पर्याय शिल्लक ठेवलेला नाही. ग्राहकांना संतोष ठेवण्यासाठी पूर्वी हा व्यवसाय परवडत होता. आता बाजारपेठेतील दरवाढीमुळे कामगारांचा वेतन देणे ही अवघड बनली आहे.

झेरॉक्स मशीन व फोटो फ्रेम व्यवसाय करणारे जैनुद्दीन तथा मुन्ना मुल्ला म्हणाले, पूर्वी कागदाचा रिम  दीडशे ते दोनशे रुपयाला मिळत होता. आता अडीचशे रुपयापर्यंत दर वाढ झाल्यामुळे झेरॉक्स यंत्रणा परवडत नाही. शासकीय कार्यालयासाठी लागणाऱ्या अनेक कागदपत्राची पूर्तता करताना सामान्य माणसाच्या खिशाला चाट बसत आहे.

राजू फडतरे यांनी सांगितले, गरिबांना कधी ही विकत घेता येणार नाही त्या वस्तूचे दर थोडे कमी व दैनंदिन गरजेच्या वस्तू महाग होणार आहेत. गरिबांना जगणे मुश्किल केले आहे. भाजप म्हणजे देशावरील आर्थिक संकट उभे आहे. गरिबांच्या घरी पूर्वी चूल नि मूल होते. आता सिलेंडरच्या दरवाढीने चूल आणि घरोघरी धूर नजीकच्या काळात दिसणार आहे.

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. वैभव माने यांनी सांगितले, हा अर्थ संकल्प सर्व समावेशक असून भाजप सरकार सामान्य माणसाला पायाभूत सुविधा,आर्थिक विकास व स्वच्छ भारत, लसीकरण,  सेंद्रिय शेतीला जीवनदान दिले आहे. महागाई कुठे नाहीच. विकास हवा असेल तर महागाईची थोडी फार झळ सोसली पाहिजे.

सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी सौ. कल्पना लोंढे- गडांकुश यांनी सांगितले, सध्या जेष्ठ नागरिकांना बचत योजनेमुळे दिलासा मिळालेला आहे. पूर्वी पंधरा लाख रुपयांची मर्यादा होते ते तीस लाखापर्यंत करून जेष्ठ नागरिक मतदारांना सन्मान करण्याचे काम भाजपने केलेले आहे. आयकर सवलत दिली आहे.

भाजप सातारा जिल्हा सरचिटणीस अनिल माळी यांनी सांगितले, भारत देश आणि भाजप हे समीकरण झाले आहे. अर्थसंकल्प म्हणजे भारतीय संस्कृती व भारतीय जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी केलेला यशस्वीरीत्या प्रयत्न आहे.

सौ रेश्मा बनसोडे यांनी सांगितले, महिलांसाठी केंद्रीय कृषिमंत्री महिलेने मांडलेला अर्थसंकल्प जगण्याची नवी उमेद देणारा ठरला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करावे असा अर्थ संकल्प मांडला आहे.

गरिबांना मोफत धान्य वाटप असले तरी त्यांनी शिजवायचे कसे ?  याची अर्थसंकल्पातून प्रश्नचिन्ह सोडवता आलेला नाही. सामान्य माणसांना गृहीत न धरणारा हा अर्थसंकल्प म्हणजे गरीब माणसांची चेष्टा आहे अशा शब्दात सामाजिक कार्यकर्ते दत्ता केंगारे, वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ मार्गदर्शक विश्वास जगताप, अशोक बैले व जुन्या काळातील ठेकेदार रामभाऊ जाधव यांनी सांगितले.

या अर्थसंकल्पांमध्ये एकलव्य शाळांसाठी ३८ हजार ८०० शिक्षक व सहाय्यक कर्मचारी यांना नोकरी मिळणार असली तरी उर्वरित साडेतीन लाख शिक्षक पदविका पदवी घेणाऱ्या बेरोजगारांसाठी कोणती योजना आहे? हे अजूनही गुलदस्त्यात आहे. १३२ साखर कारखान्यांना ९,५०० कोटीची आयकर वसुली रद्द करून कारखानदारांची हित पाहणार असल्याने भाजपमध्ये येण्याचा हे निमंत्रणच आहे. अशा शब्दात सहकार चळवळीत काम करणाऱ्या नेत्यांनी आपले नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

सर्वसामान्य गोरगरीब, कामगार, शेतमजूर महिला वर्गाला  सकाळी सिलेंडर पेटवताना महागाईचा विचार करावा लागत आहे. घरातून बाहेर पडत असताना वाढत्या डिझेल- पेट्रोलमुळे महिला सुद्धा आता मुलांना शाळेत नेण्यासाठी सायकलचा वापर करतील. त्यामुळे सत्तर वर्षात काँग्रेसने काय केले तर ७० वर्षांमध्ये सार्वजनिक वाहनातून प्रवास करणाऱ्या महिलांना सायकलवर आणले नाही. ते काम भाजप करत आहे. अशी टीका व्यक्त केली जात आहे.

सध्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाला न परवडणारे औषध उपचार झाले आहेत. सर्वसामान्य लोकांना चांगले व कमी दरात आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी आजही ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय व्यावसायिक प्रामाणिकपणे काम करतात. त्यांच्यासाठी किमान पुढील वर्षी अर्थसंकल्पामध्ये चांगली तरतूद केल्यास एक देश सेवा म्हणून या क्षेत्राकडे पाहतील असा आशावाद डॉ. अरुण माने यांना आहे.

भाजपने सत्ता मिळविताना जी आश्वासन दिलेली आहेत.त्याचा विसर पडला आहे. लोकांना गाजर दाखवण्याची परंपरा केंद्र सरकारने सुरू केली आहे. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांनी मतदान करताना हा अर्थसंकल्प डोळ्यासमोर ठेवावा. अशी अपेक्षा राजकीय विश्लेषक व अर्थ संकल्प अभ्यासक शिवाजी राऊत यांनी व्यक्त केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नाशिक हादरलं! पोलिसाचा शिक्षिकेवर अत्याचार, प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी अन…

Saturday, 17 May 2025, 15:52

Parali Crime: युवकाचे अपहरण करून बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल…

Saturday, 17 May 2025, 15:47

तुळजापूर ड्रग्स प्रकरण : ‘या ‘भाजप नेत्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

Saturday, 17 May 2025, 15:18

Breaking News : पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल यांची नियुक्ती

Saturday, 17 May 2025, 13:32

उजनी धरण विषारी पाण्याच्या विळख्यात, धरणाकाठचे नागरिक आजाराने त्रस्त ; जलतज्ज्ञ राजेंद्र सिंहांचा दावा

Saturday, 17 May 2025, 13:18

पिंपरी महापालिकेची कारवाई ; तब्बल 36 अनाधिकृत बंगल्यावर बुलडोझर चालवला

Saturday, 17 May 2025, 12:32
Next Post

लोणावळ्यात पोलीस कर्मचाऱ्याला गुन्हेगारांच्या टोळीकडून बेदम मारहाण; ८ जणांवर गुन्हा दाखल ...!

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.