अहिल्यानगर : नगर शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाचे अपहरण करून त्याला डोंगरात नेऊन जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. पूर्वीच्या जुन्या भांडणाच्या रागातून अहिल्यानगरमध्ये एका तरुणाचे दुपारी अपहरण करून एका फ्लॅटमध्ये नेऊन मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह कारमधून एक डोंगरात जाळून हाडे आणि राखही फेकून देण्यात आली. अआता या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातून वैभव शिवाजी नायकोडी याचं २२ फेब्रुवारीला अपहरण झालं होतं. त्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली त्यातच त्याचा मृत्यु झाला. पोलिसांनी या प्रकरणी अनिकेत उर्फ लपका विजय सोमवंशी, सुमित बाळासाहेब थोरात, महेश मारोतीराव पाटील, नितीन उर्फ निशिकांत अशोक नन्नवरे या आरोपींना अटक केली आहे.
वैभव शिवाजी नायकोडी या तरुणाचे अपहरण झाल्यानंतर आरोपींवर अपहारणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेंव्हा आरोपींनी पोलिसांना सांगितलं की, आम्ही वैभवचं अपहरण केलं होतं. मात्र तो आमच्या ताब्यातू पळून गेला. या नंतर पोलिसांनी वैभवचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर एका डोंगरावर मृत वैभव याला जाळून त्याची हाडे व राख फेकून देऊन पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केल्याची कबुली करण सुंदर शिंद, रोहित बापुसाहेब गोसावी,विशाल दिपक कापरे, विकास अशोक गव्हाणे, आणि स्वप्नील रमाकांत पाटील यांनी दिली. याप्रकारणा बाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी या घटनेची माहिती दिली.