बापू मुळीक
पुणे : ‘नाथ साहेबांचे चांगभलं’च्या गजरात श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या पालखीचे हजारो भाविकांसह आज (दि.११) दुपारी १ :०० वाजता वीरकडे प्रस्थान झाले आहे. सोमवार दि. १० रोजी रात्री ९:३० वाजता पुजा आरती करुन, कोडीत येथील गावातील म्हस्कोबा महाराज मंदीरातून ढोल ताशा सनई व डफड्याच्या वांद्यात देवघरे, पाच घरे , सहा घरे, फुलावरे, ढोले, काटकर, पंचात्रे ,काळूबाई व अबादागिरी मंडळासह सर्व मानकरी भक्तगण व ग्रामस्थांच्या उपस्थितीत नाथ महाराजांची पालखी देऊळवाड्यातून, सवाई मिरवणूकीने माघ पौर्णिमा ते विजया दशमी अशा १३ दिवसाच्या यात्रेसाठी कोडीतहून श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या पालखीचे सर्व मानकाऱ्यांसह श्रीनाथांचे भक्त तुळाजीबुवा यांच्या मंदिराकडे फटाक्यांच्या आतिषबाजीत तुळाजीबुवा मंदीरात मुक्कामासाठी विसावली, त्याठिकाणी नाथांच्या ओव्यांचा कार्यक्रम झाला.
आज दि.११ रोजी सकाळी, नाथांच्या मुर्तीला अभिषेक करण्यात आल्यानंतर व पुजा अर्जा करण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांच्यावतीने श्रींना पुरण पोळीचा नैवद्य देण्यात आला. सकाळ पासूनच भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. यावेळी सासवड, दिवे भिवडी, गराडे, चांबळी, हिवरे, नारायणपूर, सोमर्डी पोखर यासह तालुक्यातील विविध गावाच्या भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले, नवसाला पावनारा देव अशी कोडीत व वीरच्या म्हस्कोबा महाराजांची ख्याती असल्याने नाथांच्या दर्शनासाठी गर्दी ओसांडून वाहताना दिसत होती.
आज मंगळवार दुपारी १ : ०० वाजता नाथांच्या पालखीने वीरकडे प्रस्थान केले. यावेळी कोडीत येथील नाथांचे मानकरी, बडधे, जरांडे राजिवडे, सोनवणे, कांबळे, भोसले, औचरे खैरे, तळेकर, जाधव, नेलेकर, आहेरकर, खोमणे यासह पंचक्रोशीतील हजारो भक्तगण व भाविकांसह श्रीनाथांच्या पालखीने माघ पौर्णिमा ते दशमी पर्यंतच्या मुक्कामासाठी वीरकडे प्रस्थान केलेया आहे.