फतेहपूर: देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच, फतेहपूर जिल्ह्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पतीच्या सततच्या छळाला आणि अत्याचाराला कंटाळून पत्नी आणि तिच्या अल्पवयीन मुलाने मिळून त्याची हत्या केल्याचे उघड झाले आहे. (latest crime news)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना फतेहपूर कोतवाली परिसरातील मीरपूर गावातील आहे. येथे १८ नोव्हेंबर रोजी सकाळी बड्डूपुर मार्गाच्या कडेला शेतकरी राजमल (वय अंदाजे ४५) यांचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला हत्येचे कोणतेही स्पष्ट कारण समोर येत नसल्यामुळे तपास पुढे सरकला नाही.
हेही वाचा: हॉस्पिटलच्या गेटवरच जोडप्याचं ‘अश्लील कृत्य’! चादर अंगावर ओढली अन्
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तांत्रिक तपासानंतर पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. मृत राजमलला दारूचे व्यसन होते. तो पत्नी व मुलांना दररोज मारहाण करत असे. एवढेच नव्हे तर तो पत्नीवर पैशांसाठी दुसऱ्या पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा दबाव टाकत होता.
सततच्या या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून पत्नीने आणि तिच्या १७ वर्षीय मुलाने राजमलला संपवण्याचा निर्णय घेतला. १७ नोव्हेंबरच्या रात्री राजमल एका धार्मिक कार्यक्रमातून परतल्यानंतर बाहेर पडला. याच वेळी पत्नी आणि मुलगा त्याच्या मागे गेले.एका निर्जन ठिकाणी पोहोचताच दोघांनी त्याला ढकलले आणि खाली पडून मुलाने त्याचे हात घट्ट पकडले आणि पत्नीने त्याचा गळा दाबून त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर दोघांनी राजमलचा मृतदेह रस्त्याच्या शेजारी टाकून दिला आणि ते घरी परतले.
चौकशीत गुन्हा कबूल
गावकऱ्यांनी मृतदेह पाहून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी कुटुंबीयांची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान, पत्नीने राजमलच्या वाईट कृत्यांचा आणि सततच्या छळाचा खुलासा केला. अखेरीस पत्नीने आपला गुन्हा कबूल केला आहे.
पोलिसांनी पत्नी आणि तिच्या अल्पवयीन मुलाला तात्काळ अटक केली असून त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. याघटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.







