मुंबई: स्थानिक स्वराज्य (Local Bodies Election) संस्थांच्या निवडणुकीच्या (Shivsena) पार्श्वभूमीवर (Eknath Shinde) शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुखांच्या नियुक्तीची मोठी घोषणा करण्यात आली आहे. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि पायाभूत नेटवर्क वाढवण्यासाठी 40 ठिकाणी नवीन संपर्क प्रमुख नियुक्त करण्यात आले आहेत. येणाऱ्या निवडणुकांपर्यंत हे नेते आपल्या संबंधित जिल्ह्यांमध्येच राहून काम पाहणार आहेत, असे निर्देश पक्ष नेतृत्वाकडून देण्यात आले आहेत.

प्रसिद्धीपत्रकानुसार खासदार नरेश म्हस्के यांच्यावर ठाणे, नवी मुंबई आणि पुणे या तीन महत्त्वाच्या भागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महापालिका, नगरपरिषद आणि ग्रामपंचायतींसह अनेक स्थानिक निवडणुका होत असल्याने विविध ठिकाणी राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. काही नगरपरिषदांमध्ये निवडणुका बिनविरोध झाल्या असल्या तरी अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती दिसत आहेत.
घोषित केलेल्या यादीत कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या सर्व विभागांतील ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. सिंधुदुर्ग येथे किरण पावसकर आणि राजेश मोरे, तर रत्नागिरीत यशवंत जाधव यांची नियुक्ती झाली आहे. नवी मुंबई आणि ठाणे शहर या दोन्ही भागांची जबाबदारी नरेश म्हस्के यांच्या अखत्यारीत आहे. पुणे जिल्ह्यातही म्हस्के यांचीच नियुक्ती झाली असून पिंपरी चिंचवडमध्ये सिद्धेश कदम यांना काम देण्यात आले आहे.
कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही अनुभवी नेते संपर्क प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. तसेच विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली येथेही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, लातूर आणि हिंगोलीमध्ये नियुक्त्या जाहीर झाल्या आहेत.
या निर्णयामुळे शिवसेनेची संघटना निवडणुकांच्या अगोदर मजबूत करण्याचा पक्षाचा प्रयत्न स्पष्ट दिसतो आहे. आगामी स्थानिक निवडणुकांत या संपर्क प्रमुखांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.







