मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये अटल सेतूवर वारंवार होणाऱ्या आत्महत्येच्या घटना घडताना दिसत आहेत. अशातच आणखी एकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अलिबागमधील एका शिक्षकाने अटल सेतूवरून खाली उडी मारून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. वैभव इंगळे असं आत्महत्या केलेल्या शिक्षकाचं नाव असून ते अलिबाग तालुक्यातील शिवाजीनगर कुर्डुस येथील रहिवासी होते.
अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या
वैभव इंगळे या शिक्षकाने अटल सेतूवरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. वैभव इंगळे आपल्या कारमधून सकाळी अटल सेतूवरून जात असताना अटल सेतूवरून जात असताना त्यांनी आपली कार थांबवली. त्यानंतर अटल सेतूवरून त्यांनी उडी घेऊन आत्महत्या केली. एका प्राथमिक शाळेतील शिक्षकाने असं टोकाचं पाऊल का उचललं असावं? याचा तपास पोलीस करीत आहेत.
नेमकं कारण काय?
काल (शुक्रवारी, ता-15) सकाळी 9 च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांना माहिती या घटनेची मिळताच तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वैभव इंगळे यांचा शोध पोलीस घेत आहे. वैभव यांनी सेक्सटॉर्शनमुळे आणि मिळणाऱ्या धमक्यांमुळे हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. ते अलिबाग तालुक्यातील कुर्डुस गावातील जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. समाजात बदनामीची भीती असल्याने त्यांनी जीवन संपवण्यासाठी टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा आहे.
घरात काहीच न सांगता पडले घराबाहेर..
वैभव इंगळे हे सकाळी 7.30 वाजता घरात काहीच न सांगता घराबाहेर पडले. त्यांनी त्यांचा मोबाईल फोन घरीच ठेवून दिला. ठेवला, चिरनेरमार्गे अटल सेतू पुलापर्यंत गेले. पुढे पुलावरती जवळजवळ 9 किलोमीटर अंतर गाडी चालवल्यानंतर त्यांनी गाडी पार्क केली आणि अवघ्या काही क्षणातच त्यांनी पुलावरून उडी मारली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात गाडी पार्क केल्याची घटना कैद झाली आहे. त्यापूर्वीच वैभव पिंगळे हे समुद्रात वाहुन गेले होते. त्यानंतर उलवे पोलिसांनी व सागरी सुरक्षा विभागाकडून त्यांची शोधमोहीम सुरु करण्यात आली होती. मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांचा मृतदेह पोलिसांना सापडून आला नाही.