पुणे प्राईम न्यूज डेस्क: आपण आपले दैनंदिन काम करून थकतो. हा थकवा फक्त शारीरिक नसतो, अनेकदा मानसिकही असू शकतो. त्यासाठी पुरेशी झोप घेण्याचा सल्ला दिला जातो. पण, पुरेशी झोप घेऊनही थकवा जाणवत असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे झाले आहे. झोपेच्या वेळी घशाचे स्नायू आकुंचन पावल्यामुळे वायूप्रवाहात अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे रात्रीची झोप अनेकवेळा नीट लागत नाही.
मधुमेह, नैराश्य आणि पोटाशी संबंधित समस्या ही सतत थकवा जाणवण्यामागील कारणे असू शकतात. या आरोग्य समस्यांच्या लक्षणांवर नियंत्रण आणि उपचार करणे शक्य आहे. याशिवाय काही औषधे घेतल्यानेही थकवा येऊ शकतो. थकवा या समस्येचे निदान करण्याचा सर्वात खात्रीशीर मार्ग म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेणे हा आहे. तसेच मसाजने, अल्कोहोल आणि कॅफिन टाळून ही समस्या टाळता येऊ शकते. कधीकधी लोहाच्या कमतरतेवर उपचार केल्याने आराम मिळतो. थकवा येण्यामागे इतरही अनेक कारणे असू शकतात.
जीवनसत्त्वे किंवा खनिजांची कमतरता हे याचे कारण असू शकते. शाकाहारी आहारावर जास्त अवलंबून राहणे किंवा महिलांबाबत मासिक पाळीच्या समस्यांमुळे लोहाची कमतरता होऊ शकते. याशिवाय व्हिटॅमिन डी आणि बी 12 च्या कमतरतेमुळेही थकवा येतो. हे सप्लिमेंट्सद्वारे सोडवले जाऊ शकते