पुणे: राज्यात अनेक ठिकाणी तापमानात प्रचंड वाढ होणार असून उष्णता वाढणार आहे. राज्यात अजूनही अनेक ठिकाणी तीव्र उष्णता आणि काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. ताज्या अंदाजानुसार, विदर्भ आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर राज्याच्या इतर भागात उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागेल. मुंबई शहरात २४°C ते ३४°C पर्यंत तापमानासह उष्ण दिवस अनुभवण्याची अपेक्षा आहे. पुण्यात २७ एप्रिल रोजी ४१°C पर्यंत उच्चांक नोंदवल्यानंतर, पुण्यात आज तापमान ४०°C पर्यंत कमी होणार असून तापमानात किंचित घट होण्याची अपेक्षा आहे. पुणे जिल्ह्यात उष्णतेचा चटका कायम असून पुढील 24 तासात पुण्यातील पारा 40 अंशांवर जाण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. चंद्रपूर, अकोला, नागपूर, जालना आणि बीड या जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.
जाणून घेऊया, मराठवाडा आणि विदर्भाची परिस्थती काय
विदर्भ: पुढील चार ते पाच दिवसांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे कडक उन्हापासून आराम मिळेल.
मराठवाडा: काही जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी पडू शकतात, ज्यामुळे उष्णतेपासून थोडासा आराम मिळेल.
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी हलक्या पावसाची नोंद होऊ शकते. धाराशिव, सोलापूर, पलातूरआणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही भागांत 27 आणि 28 एप्रिल रोजी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट तीव्र राहण्याची शक्यता आहे.