औसा (लातूर): आर्थिक वित्तीय पहिली ग्रामसभा आर्थिक वित्तीय वर्ष सरू झाल्यापासून दोन महिन्याच्या आत दोन्ही वर्षी न घेतल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी औसा तालुक्यातील बेलकुंडचे सरपंच विष्णू निवृत्ती कोळी यांना दोषी ठरवले आहे. कोळी यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ७ नुसार दोषी ठरवून अपात्र घोषित करून बेलकुंड या ग्रामपंचायतीचे सरपंच पद रिक्त झाल्याचे घोषित केले. विष्णू कोळी हे औसा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष म्हणून सभा समारंभात मंचावर विराजमान होत असत.
बेलकुंड येथील ज्ञानेश्वर शिवाजी पवार उर्फ दादासाहेब पवार यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ७ नुसार दिनांक १२/१२/२०२३ रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे दावा दाखल करून प्रकरण स्वतः चालवले. सदर प्रकरणातील पुरावे, गटविकास अधिकारी यांचा अहवाल, बेलकुंड ग्रामपंचायत ग्रामसेवक यांचा अहवाल, सदर प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षाकडून झालेला अंतिम युक्तिवाद, प्रकरणातील उपलब्ध संचिकेनुसार जिल्हाधिकारी न्यायालयाने आदेश पारित केले.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ७ नुसार वर्ष २०२२-२३ मध्ये फक्त दोनच ग्रामसभा घेतल्यामुळे, तसेच वर्ष २०२२-२३ व २०२३-२४ मध्ये आर्थिक वित्तीय पहिली ग्रामसभा आर्थिक वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून दोन महिन्याच्या आत दोन्ही वर्षी न घेतल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी बेलकुंडचे सरपंच यांना दोषी ठरवले.