मुंबई : वडिलांच्या मृत्यूनंतर मिळालेल्या नुकसान भरपाईवर मुलगीही ‘वर्ग-1’ वारसदार असून तिलाही समान हक्क आहे, असा स्पष्ट निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे.या निर्णयामुळे वडिलांच्या संपत्तीवरील हक्काच्या संदर्भात महिलांचे अधिकार अधिक बळकट झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,वडिलांच्या मृत्यूनंतर मिळालेल्या नुकसानभरपाईवर केवळ मुलाचाच हक्क असल्याचा सोलापूर जिल्हा न्यायालयाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. त्यामुळे जमिनीच्या मोबदल्यात मिळणाऱ्या पैशावर मुलीचाही हक्क असणार असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केल आहे.
नेमकं काय प्रकरण?
सोलापूरच्या एका महिलेने या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या एकलपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. याचिकाकर्त्या महिलेसह तिची आई आणि भाऊ या तिघांचे नाव वडिलांच्या मृत्यूनंतर सातबाऱ्याच्या नोंदीवर चढविण्यात आले होते.या निर्णयाविरोधात महिलेनं उच्च न्यायालयात धाव घेतली. यावेळी न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत सांगितले की, हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार मुलगी विवाहित असो वा अविवाहित, ती वडिलांच्या मालमत्तेवर ‘वर्ग-1’ वारसदार म्हणून हक्काची आहे. विवाहाची तारीख या अधिकारावर परिणाम करत नाही.तिचाही तेवढा समान हक्क असणार आहे.