उरुळी कांचन, (पुणे) : येथील स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान संचलित स्वामी विवेकानंद अकॅडमी सीबीएसई शाळेने यंदाच्या शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये देखील आपली गुणवत्ता सिद्ध करत दहावीच्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
यावर्षी क्षितिजा विजयकुमार काळे हिने 92.2 टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. साहील श्रीनाथ म्हेत्रे याने 92.0 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक, तर साई उमेश मनोतिया हिने 91.0 टक्क्यांसह तृतीय क्रमांक मिळवला. कावेरी पृथ्वीराज कुंजीर (90.2%) व ईश्वरी राजू पोळ (89.6%) यांनी अनुक्रमे चतुर्थ व पाचवा क्रमांक मिळवत शाळेच्या यशात भर घातली.
दरम्यान, या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकवर्गाचे अभिनंदन केले आहे. शाळेचे प्राचार्य डॉ. सुमित दास व उपप्राचार्य बाबासाहेब ठुबे यांचे मार्गदर्शन, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे परिश्रम या यशामागील आधारस्तंभ ठरले.