उरुळी कांचन, (पुणे) : येथील स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान संचलित स्वामी विवेकानंद विद्यामंदिरचा इयत्ता दहावीचा निकाल सलग नवव्या वर्षी 100 टक्के लागल्याची माहिती मुख्याध्यापिका ज्योती भोसले यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज मंगळवारी (ता. 13) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. विद्यालयातील 151 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील सर्वच विद्यार्थी पास झाले आहेत.
प्रथम पाच आलेले विद्यार्थी कंसात टक्केवारी
प्रथम, मोनिका सचिन देवकते (96.40 टक्के)
द्वितीय, करुणा किरण नाईक (95.40 टक्के,
तृतीय, आयेशा हनीफ शेख (93.00 टक्के,
चतुर्थ, संस्कृती राहुल काटे 92.60 टक्के, स्वस्तीका दिलीप खेडेकर (92.60 टक्के),
पाचवा, आदित्य सुहास जगताप व आर्या ज्ञानेश्वर चोरघे 92.20 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
दरम्यान, 151 विद्यार्थ्यांपैकी 73 विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. 62 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 16 विद्यार्थी दुसऱ्या श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या 156 विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. तसेच शाळेचे नावलौकिक वाढविले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, शाळा समिती अध्यक्ष, सर्व सल्लागार समिती सदस्य, मुख्याध्यापक ज्योती भोसले यांनी अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.