उरुळी कांचन,(पुणे) : उरुळी कांचन येथील अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन संचलित डॉ. अस्मिता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. अशी माहिती संचालक डॉ. अप्पासाहेब जगदाळे यांनी दिली.
प्रथम अक्षय अविनाश बारबोले (86.40टक्के), द्वितीय वैष्णवी ज्योतीराम लोंढे (83.80 टक्के), अंजली नितीन गोते (83.80 टक्के), तृतीय प्रांजल राजेंद्र गिरमे (83.40टक्के), चतुर्थ अक्षदा संतोष रणसिंग (83.20 टक्के) तर पाचवा क्रमांक हा सृष्टी सुनील कोल्हे (82.00 टक्के) गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज मंगळवारी (ता. 13) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. विद्यालयातील 78 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील सर्वच विद्यार्थी पास झाले आहेत.
विद्यार्थीच्या या उज्वल यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव कांचन, सचिव डॉ. अजिंक्य कांचन, संचालक डॉ. अप्पासाहेब जगदाळे, प्राचार्य रोहिणी जगताप, उपप्राचार्या कांचन चव्हाण, संपूर्ण स्टाप यांनी विद्यार्थांचे अभिनंद केले. तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 100 टक्के लागल्याने उरुळी कांचन व परिसरातून विशेष कौतुक केले जात आहे.
दरम्यान, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव कांचन म्हणाले, “यशस्वी विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक युगात विज्ञान शाखेचा अवलंब करून बारावी सारख्या शाखेतून पदवीधर व्हावे. त्यातून वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकीक करावा. वाणिज्य व कला शाखेतून देखील स्पर्धा परीक्षांना वाव आहे. आत्ता पासून स्पर्धा परिक्षांचा अभ्य़ास करा. आपले जीवन बलशाही बनवायचे असेल तर कष्ट, चिकाटी व जिद्दी शिवाय यशाला पर्याय नाही.”