दौंड(पुणे): खुटबाव (ता.दौंड) येथील भैरवनाथ विद्यालयाचा बारावीचा विज्ञान शाखेचा निकाल 99.41 टक्के लागला आहे. या परीक्षेत राजलक्ष्मी तानाजी टुले ( 84.33) गुण मिळवत प्रथम, तर चैत्राली धनंजय पवार (80.50) द्वितीय तर वृषाली शंकर टूले (79.67) तृतीय आली आहे. अशी माहिती भैरवनाथ विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र जगताप यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावी व बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. बोर्डाने आज सोमवारी (ता. 5) दुपारी 1 वाजता बारावी परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला. या परीक्षेत भैरवनाथ विद्यालयातील विज्ञान शाखेतील 171 पैकी 170 विद्यार्थी पास झाले असून 99.41 टक्के निकाल लागला आहे. तर वाणिज्य शाखेतील 78 पैकी 75 विद्यार्थी पास झाले असून 96.15 टक्के निकाल लागला आहे. कला शाखेतील 51 पैकी 44 विद्यार्थी पास झाले असून 86.27 टक्के निकाल लागला आहे. या निकालात सर्वच शाखांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे.
विद्यालयाच्या वाणिज्य शाखेतून मानसी दत्तात्रय शिंदे हिने 82.33 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम, प्राजक्ता कृष्णा हाके हिने 73.50 टक्के गुण मिळवून द्वितीय तर तनिष्का राहुल अवचट हिने 73.17 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. तर कला शाखेतून मोहिनी सुनील इंगळे हिने 75.00 टक्के गुण मिळवून प्रथम, ओंकार संदीप गिरमे याने 70.50 टक्के गुण मिळवून द्वितीय तर राजेश्वरी संभाजी माकर हिने 62 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.
दरम्यान, यशस्वी विद्यार्थ्यांचे खुटबावसह परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे. तर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शक शिक्षकांना पेढा भरवून आनंद साजरा केला. यावेळी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे भैरवनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार रमेश थोरात, उपाध्यक्ष भाऊसाहेब ढमढेरे, सचिव सूर्यकांत खैरे, खजिनदार अरुण थोरात, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र जगताप, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.