नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानात युद्धाला सुरुवात झाली आहे. भारत आणि पाकिस्तानदरम्यान मागील दोन दिवसांपासून तणाव वाढला आहे. आता भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरू झाला आहे. दरम्यान, भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. पाकिस्तानला चीन नेहमीच मदत करत होता. परंतु एका वेगळ्या देशाने भारत आणि पाकिस्तानात सुरु असलेल्या संघर्षात उडी घेतली आहे. भारताने केलेल्या हल्ल्याचा निषेध करत तुर्कियेने पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला आहे. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर, तुर्कियेने पाकिस्तानला पाठिंबा दिला ज्यामुळे त्याच्या हेतूंबद्दल अटकळ निर्माण झाली आहे. भारत आणि पाकिस्तानात सुरु असलेल्या संघर्षात तुर्कीचे विमान पाकिस्तानात उतरले आहे, ज्यामुळे भारत आणि तुर्कीमध्ये राजनैतिक वाद निर्माण झाला. भारताने लँडिंगवर आक्षेप घेतला, परंतु तुर्कियेने दावा केला की, विमान काही मिनिटांसाठी पाकिस्तानात उतरले असून आम्ही लगेच विमान परत बोलावत आहोत, असं सांगितले.
दरम्यान, तुर्कियेने विमानातून पाकिस्तानला रसद पुरवल्याची शक्यता बोलली जात आहे. तसेच पाकिस्तानला काही ड्रोन्स पुरवले असावेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तुर्कीच्या या निर्णयामुळे भारत-तुर्की संबंध ताणले गेले आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना, तुर्कियेने पाकला मदत केल्याचे कुणीही अधिकृतपणे सांगितले नाही. परंतु पाकिस्तानला पाठींबा दर्शवल्यानंतर तुर्किये पाकिस्तानला मदत करत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.