शिवपुरी (मध्य प्रदेश): मध्य प्रदेशातील शिवपुरी महामार्गावर झालेल्या एका भीषण कार अपघातात डॉ. तन्वी आचार्य आणि डॉ. नीलम पंडित या दोन महिला डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यापासून घसरून पुलावरून पडल्याने हा अपघात भीषण अपघात घडला आहे. सगळे प्रवासी 10 दिवसापूर्वी तीर्थ यात्रेला निघाले होते. दरम्यान, अयोध्यामध्ये दर्शन घेतल्यानंतर सगळे भाविक उज्जैनच्या दिशेने उज्जैन महाकालेश्वर मंदिराकडे प्रवास करत होते. डॉ. अतुल आचार्य, डॉ. उदय जोशी, डॉ. सुबोध पंडित आणि डॉ. सीमा जोशी हे चार डॉक्टर अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात डॉ. तन्वी आचार्य यांचा जागीच मृत्यू झाला असून डॉ. नीलम पंडित यांचा रुग्णालयात नेत असतांना मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच कोलारस पोलीस ठाण्याचे पोलिस घटना स्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात नेले. सकाळी आठ वाजता हा अपघात झाला आहे. सगळे प्रवासी मुंबईतील असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, अर्टिंगा कार चालक डॉ. अतुल आचार्य यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. कवासा बायपासवर त्यांचे कारवरील नियंत्रन सुटले, कार रस्त्यावरून घसरून पुलावरून पडली, ज्यामुळे दुर्दैवी जीवितहानी झाली. मृत डॉक्टरांचे मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मृत डॉक्टरांसाठी शोकसंवेदना व्यक्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि मित्रांनी त्यांच्या अचानक आणि दुःखद निधनाबद्दल धक्का आणि दुःख व्यक्त केले आहे.