मुंबई : मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. आता या हल्ल्याबाबत भाजप नेते माधव भंडारी यांनी केलेल्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुंबईतील 26/ 11 च्या हल्ल्यात सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.
भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष माधव भंडारी याबाबत पुढे बोलताना म्हणाले, मुंबईवर झालेल्या हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा अदृश्य हात होता,त्या लोकांना हल्ला होणार याची त्यांना कल्पना होती. स्थानिक प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीच्या सहभागाशिवाय एवढा मोठा हल्ला घडू शकत नाही.असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलं आहे
दरम्यान एका प्रेस नोटद्वारे सरकारने हल्ला होणार असल्याची शक्यता आहे अशी माहिती दिली होती. त्यातील 85% जागेसहित माहिती होती. पाच महिने अगोदर सरकारला जर माहिती होतं हल्ला होणार आहे, तर मग ती सरकारची जबाबदारी होती हल्ला रोखण्याची. माहिती असून सुद्धा राज्य सरकारने तो हल्ला का रोखला नाही?” असा सवाल माधव भंडारी यांनी उपस्थित केला.
तसेच 26/11 च्या हल्ल्यात अनेक अधिकारी आणि कर्मचारी शहीद झाले. मग आता तहव्वुर राणाला भारतात आणल्यावर त्यावर चर्चा सुरू झाली .ज्यावेळेस 26/11 ला हल्ला घडला त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांची, गृहमंत्र्यांची ती जबाबदारी होती. त्यांनी ती उत्तरं द्यायला हवी होती असंही माधव भंडारी यांनी म्हटलं आहे