नवी दिल्ली: नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर स्कूल एज्युकेशनने (NCERT) नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) आणि शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम चौकट (NCFSE) २०२३ च्या अनुषंगाने इयत्ता ७ वी च्या सामाजिक विज्ञान पाठ्यपुस्तकात मोठे बदल केले आहेत. पुस्तकातून मुघल साम्राज्य आणि दिल्ली सल्तनतवरील प्रकरणे काढून टाकण्यात आली आहेत. आता Exploring Society: India and Beyond या पुस्तकात मौर्य, मगध, शुंग आणि सातवाहन यासारख्या प्राचीन भारतीय राजवंशांवरील नवीन प्रकरणे जोडण्यात आली आहेत. भारतातील धार्मिक स्थळे आणि तीर्थक्षेत्रांचा How the Land Becomes Sacred या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये चार धाम यात्रा, १२ ज्योतिर्लिंगे आणि शक्तीपीठे यांचा समावेश आहे. – “मेक इन इंडिया” आणि “बेटी बचाओ, बेटी पढाओ” सारख्या शासकीय योजनांचा पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे.
विरोधकांकडून बदलाला विरोध
या बदलांमुळे वाद निर्माण झाला आहे, विरोधी पक्षांनी सरकारवर शिक्षणाचे “‘भगवाकरण” करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. एनसीईआरटीचे संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांनी यापूर्वी म्हटले होते की, मुलांना दंगलींबद्दल शिकवल्याने नकारात्मक परिणाम होऊ शकतात. सुधारित बदलांचा उद्देश भारताच्या परंपरा, ज्ञान प्रणाली आणि स्थानिक संदर्भांना प्राधान्य देणे आहे. तथापि, काही ऐतिहासिक कालखंड आणि घटना वगळल्याबद्दल चिंता कायम आहे. “एक्सप्लोरिंग सोसायटी: इंडिया अँड बियॉन्ड” हे नवीन पाठ्यपुस्तक उपलब्ध असून दुसरा भाग येत्या काही महिन्यांत प्रकाशित होण्याची अपेक्षा आहे.
काढून टाकलेले प्रकरण पाठ्यपुस्तकाच्या दुसऱ्या भागात समाविष्ट केले जातील की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. या बदलांमुळे शिक्षणातील इतिहास आणि संस्कृतीची भूमिका आणि बदलेल्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आकलनावर होणाऱ्या परिणामाबद्दल वादविवाद सुरू झाला आहे.