मुंबई : मुंबईकरांची गर्दी, गोंगाट आणि वाहतूक कोंडीतून आता लवकरच सुटका होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एक्वा लाईन म्हणजेच मेट्रो-3 च्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना गर्दीशिवाय थेट भुयारीमार्गाने प्रवास करता येणार आहे. आरे ते वरळी या प्रवासासाठी फक्त ३६ मिनिटांचा वेळ लागणार आहे.
. मेट्रो ३ लाईन ही ३ टप्प्यांमध्ये मुंबईकरांसाठी सुरू होणार आहे. आरे ते बीकेसी, बीकेसी ते वरळी आणि वरळी ते कफ परेड असे ३ टप्प्यात मेट्रो सुरू होणार आहे.मेट्रो लाइन 3 चं काम अंतिम टप्प्यात आलं आहे.ऑक्टोबर 2024 मध्ये मेट्रो 3 च्या पहिल्या टप्प्याला सुरूवात झाली होती. त्यावैळी ही मेट्रो आरे ते बीकेसीपर्यंत सुरू करण्यात आली. त्यानंतर आता आचार्य अत्रे मेट्रो (वरळी नाका) स्टेशनपर्यंत मेट्रो सुरू होणार आहे. मेट्रो ३ लाईनवर धावल्यानंतर मुंबईकरांना गर्दी, गोंगाट आणि वाहतूक कोंडीतून सुटका मिळणार आहे
बीकेसी ते वरळी हा दुसरा टप्प्याचे उद्या लोकार्पण होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात धारावी, शितळादेवी मंदीर, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी आणि आचार्य आत्रे चौक या स्थानकांचा समावेश असणार आहे. बीकेसी ते सिद्धिविनायक मंदिर स्थानकापर्यंत मुख्यमंत्री मेट्रोने प्रवास करणार आहे. तर तिसरा टप्पा जुलैमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.