पुणे : पंतप्रधान किसान योजना ही केंद्र सरकारची लोकप्रिय योजना आहे. या योजनेपासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना आता पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे.येत्या 15 एप्रिलपासून नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे वंचित शेतकऱ्यांना आता या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत मिळते. ही रक्कम प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. आतापर्यंत पंतप्रधान किसान योजनेचे 19 हप्ते प्राप्त झाले आहेत.पंतप्रधान किसान योजनेचा 20 वा हप्ताही लवकरच जारी केला जाणार आहे.योजनेअंतर्गत लहान आणि सीमांत शेतकरी अर्ज करू शकतात. शेतकऱ्याकडे शेतीसाठी योग्य जमीन असावी.शेतकऱ्याचे नाव राज्य किंवा केंद्र सरकारच्या जमिनीच्या नोंदींमध्ये नोंदवलेले असावे.तसेच अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड, बँक खाते आणि मोबाईल क्रमांक योजनेशी जोडलेले असावेत.
ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया कशी कराल?
सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जाऊन होम पेजवर दिलेल्या ‘नवीन शेतकरी नोंदणी’ पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका. यानंतर तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर टाकून तुमचे राज्य निवडावे .स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड भरा आणि तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवलेला OTP एंटर करा.
जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. येत्या 15 एप्रिलपासून आता वंचित शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.