मुंबई : इंडियन आर्मीत सध्या अग्नीवीर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार नुकतीच मुंबईच्या भूदल भरती अधिकारी कार्यालयाने जाहिरात काढली आहे. त्यानुसार आठ जिल्ह्यांमधील सन 2025 साठीच्या पहिल्या तुकडीतील अग्नीवर भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांमधील उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया आहे. उमेदवारांना 10 एप्रिल पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
‘अग्नीवीर’ ही १६व्या वर्षी संरक्षण दलांद्वारे देशसेवा करण्याची संधी देणारी योजना आहे. चार वर्षांची सेवा बजाविल्यानंतर नोकरी सोडायची असल्यास संबंधित ‘अग्नीवीर’ सैनिकाला जवळपास १०.४० लाख रुपये मिळतात. जून महिन्यात याची चाचणी घेतली जाणार असून ही चाचणी ऑनलाईन होणार असल्याने उमेदवारांनी त्यासाठी केंद्रावर येताना पुरेसा चार्ज असलेला व किमान दोन जीबी इंटरनेट डेटा असलेला स्मार्ट मोबाइल फोन सोबत घेणे आवश्यक आहे.यासंबंधीची अधिक माहिती www.joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर मिळू शकते.
अग्निपथ ही योजनेच्या माध्यमातून नियुक्ती झाल्यानंतर उमेदवारास पुढील प्रमाणे वेतन दिले जाते..
पहिले वर्ष – ३०,०००/- दर महिना
दुसरे वर्ष – ३३,०००/- दर महिना
तिसरे वर्ष – ३६,५००/- दर महिना
चौथे वर्ष – ४०,०००/- दर महिना
चार वर्षानंतर सोडताना – १०.०४ लाख रुपयांचे सेवा निधी पॅकेजद दिले जाते.