Uruli Kanchan : येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीच्या स्काऊट गाईड पथकाने राज्यस्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. भारत स्काऊट गाईड राज्य कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या अत्यंत कठीण अशा राज्य पुरस्कार चाचणी शिबिरात विद्यालयाचे 18 विद्यार्थी यशस्वी झाले असून, त्यांना राज्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

भारत स्काऊट गाईड राज्य कार्यालयामार्फत दरवर्षी या चाचणी शिबिराचे आयोजन केले जाते. यावर्षी झालेल्या विविध सत्रांमधील निकालात स्वामी विवेकानंद अकॅडमीच्या दुसऱ्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. स्काऊट गाईड विभागात 12 ते 15 फेब्रुवारी 2026 या कालावधीत झालेल्या चाचणीत आशिष रणदिवे, यशराज थोरात, विश्व जवळकर, यश कापणे, सिद्धांत शिंगे आणि उत्कर्ष किर्वे या 6 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

गाईड विभागात 16 ते 19 जानेवारी 2026 दरम्यान झालेल्या परीक्षेत स्वराली फडतरे, संस्कृती म्हेत्रे, स्वरा वलटे, अंतरा बगाडे, अक्षरा कदम, सिद्धी ढवळे, सिद्धी ठुले, सिद्धी शिवरकर, कार्तिकी काकडे, समृद्धी त्र्यंबके, कार्तिकी कामठे आणि स्वरांजली गुंजाळ अशा 12 विद्यार्थिनींनी बाजी मारली.
या राज्य पुरस्कार परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना स्काऊट शिक्षक नागेश काळभोर तसेच गाईड शिक्षिका दिपाली शिर्के व सुवर्णा कानडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यालयाची ही दुसरीच बॅच असून, शंभर टक्के विद्यार्थ्यांनी राज्य पुरस्कार मिळवण्याची परंपरा कायम राखली आहे. या ऐतिहासिक यशानंतर स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे ट्रस्टी मेंबर, प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले.
दरम्यान, या विद्यार्थ्यांची आता पुढील ध्येय असणाऱ्या सर्वोच्च ‘राष्ट्रपती पुरस्कार’ परीक्षेसाठी तयारी सुरू झाली असून, त्यासाठी त्यांना मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या यशाबद्दल पालकांनीही समाधान व्यक्त केले असून विद्यालयाच्या शिस्तबद्ध मार्गदर्शनाचे कौतुक होत आहे.







