पुणे: बहुप्रतिक्षित पुणे-नागपूर वंदे भारत ट्रेन सेवा लवकरच सुरु होणार आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील पुणे आणि नागपूर दोन प्रमुख शहरांना हाय-स्पीड रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळेल. अलिकडच्या अहवालांनुसार, केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी या मार्गावर वंदे भारत सेवा सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. सध्या, पुणे आणि नागपूर दरम्यानचा प्रवास रेल्वेने सुमारे १४-१६ तासांचा होतो. वंदे भारत सुरू झाल्यामुळे, प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होऊन फक्त ३-५ तासांचा होईल अशी अपेक्षा आहे. सेमी-हाय-स्पीड ट्रेनमध्ये हायक्लास सुविधा आणि बसण्याची व्यवस्था असणार आहे, ज्यामुळे प्रवाशांसाठी ती एक आकर्षक पर्याय बनेल. पुणे- नागपूर वंदे भारत ट्रेन कधी सुरु होणार याबद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही.
पुणे-नागपूर मार्गावर वंदे भारत सुरु झाली तर भारताच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नागपूरमधील ही चौथी वंदे भारत ट्रेन ठरेल. सध्या नागपूर-इंदूर, नागपूर-बिलासपूर,नागपूर-सिकंदराबाद या तीन मार्गांवर उपराजधानीतून वंदे भारत धावते. या ट्रेनमुळे कनेक्टिव्हिटी वाढेल आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल, ज्यामुळे या दोन्ही शहरांमधील प्रवाशांसाठी ही एक गेम-चेंजर ठरेल.