पुणे: कुटुंब न्यायालयाच्या निर्णयात मुलांनी त्यांच्या पालकांची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे यावर भर देण्यात आला आहे. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश के.व्ही. ठाकूर यांनी असे म्हटले आहे की, पालकांची काळजी घेणे हे केवळ नैतिक कर्तव्यच नाही तर मुलांचे कायदेशीर कर्तव्य देखील आहे. एका वृद्ध जोडप्याने त्यांच्या मुलाकडून, जो एका खाजगी कंपनीत चांगला पगार कमावतो, त्याच्याकडून पोटगीची मागणी करण्यासाठी याचिका दाखल केल्यानंतर हा निर्णय देण्यात आला.
तीन मुली आणि एक मुलगा असलेल्या या जोडप्याने असा आरोप केला आहे की, त्यांच्या मुलाने त्याचे चांगले उत्पन्न असूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, त्यांनी त्यांच्या मुलाच्या शिक्षण आणि संगोपनावर बराच खर्च केला होता परंतु आता तो आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. मधुमेह, हृदयरोग आणि अर्धांगवायू यासारख्या विविध आरोग्य समस्यांनी ग्रस्त असलेल्या या जोडप्याला दरमहा ₹1,300 इतकी तुटपुंजी पेन्शन मिळते.
दरम्यान, मुलाच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की, त्याला स्वतःच्या आर्थिक जबाबदाऱ्या आहेत. यात गृहकर्ज, कार कर्ज आणि पत्नीची काळजी घेण्याची जबाबदारी इत्यादीचा समावेश आहे. खूप खर्च होत असल्यामुळे तो पोटगी देऊ शकत नाही. त्याने असा दावा केला की, त्याचे पालक जाणूनबुजून त्याला त्रास देत आहेत. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने वृद्ध जोडप्याच्या बाजूने निकाल दिला आणि मुलाला दरमहा ₹16,000 पोटगी देण्याचा आदेश दिले आहेत, ज्यामध्ये दोघांना प्रत्येकी ₹8,000 रुपये देण्यात यावे असे निकालात म्हंटले आहे.