पुणे: पहलगाम हल्ल्यानंतर पुण्यातील काश्मिरी विद्यार्थ्यांना सोशल मीडियावर धमक्या येत आहेत. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या स्थानिक काश्मिरींविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्यांनी पुणे पोलिस आयुक्तांकडे संपर्क साधून राज्यात संरक्षण आणि सुरक्षिततेची हमी देण्याची विनंती केली आहे. आकिब भट या काश्मिरी विद्यार्थ्याने आपली चिंता व्यक्त केली आणि म्हटले की, पहलगाम हल्ला दुर्दैवी होता. परंतु स्थानिक काश्मीर नागरिकांनी दहशतवाद्यांना मदत केल्याचा रोष आमचावर काढला जात आहे त्यामुळे पुण्यातील काश्मिरी विद्यार्थ्यांविरुद्ध धमक्यांचा वर्षाव होत आहे. त्यांनी यावर भर दिला की, अनेक काश्मिरी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात आपले जीवन घडवले आहे आणि ते राज्यासाठी सकारात्मक योगदान देत आहेत.
विद्यार्थ्यांनी पुणे पोलिस आयुक्तांना त्यांना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे . त्यांनी अशी भीती व्यक्त केली आहे की, सध्याच्या या घटनेमुळे तणाव निर्माण झाला आहे, काही व्यक्ती स्थानिक समुदाय आणि काश्मिरी विद्यार्थ्यांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. छत्तीसगड आणि उत्तराखंड येथील काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली आहे. दरम्यान, “ज्या लोकांनी केलं त्यांना शिक्षा द्या , आम्हाला संरक्षण द्या” अशी विनंती पुणे पोलीस आयुक्तांना भेटून काश्मिरी विद्यार्थी विनंती केली आहे. शांतता आणि सौहार्द राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची विनंती विद्यार्थ्यांनी पुण्यातील अधिकाऱ्यांना केली आहे. पुणे पोलिसांनी विद्यार्थ्यांना आश्वासन दिले आहे की, ते त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलतील.