पुणे: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यातील आळंदी येथे संत ज्ञानेश्वरांच्या 701 व्या जयंती समारंभात मोठी घोषणा केली. आळंदी येथे साडेचारशे एकर जागेत संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येणार आहे. ४५० एकरांवर पसरलेल्या या प्रकल्पाचे उद्दिष्ट भारतीय आध्यात्मिक परंपरा, प्राचीन भागवत धर्मातील सनातन विचार जगभरात पोहोचवीने हा आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या विकासासाठी ७०१ कोटी रुपयांच्या बजेटसह एक व्यापक योजना तयार करण्यात आली आहे.
संत ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला असून संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठाची कल्पना हि लवकरच सत्यात उतरणार आहे. ज्ञानपीठाची स्थापना ही भारताच्या आध्यात्मिक परंपरांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हे आळंदीतील एक प्रमुख आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित होणार आहे. “ज्ञानपीठ आपल्या हातून व्हावे ही ईश्वराची योजना असावी याचे समाधान,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे.