सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक
पुरंदर: पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळ प्रकल्प बाधित एखतपुर या ठिकाणी शेतकरी व पोलिसांमध्ये झालेल्या लाटी हल्ल्यात महिला, युवक, जेष्ठ नागरिक, शेतकरी हे जखमी झाले होते. पोलिसावर दगडफेक करण्याच्या आरोपाखाली युवक शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याची सखोल चौकशी करून, न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी एडवोकेट विजय भालेराव व त्यांचे सहकारी यांनी सर्व कायदेशीर बाजू तपासून न्यायालयात शेतकऱ्याची बाजू मांडली. महेश दशरथ मोरे, दिपक रवींद्र देशमुख, सिद्धार्थ राजेंद्र होले, सुरज दत्तात्रय मेमाणे, गणेश विलास या पाच ही जणांना न्यायालयात जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान, मंजुषा गायकवाड कुंभारवळण सरपंच, नामदेव( आप्पा) कुंभारकर माजी सरपंच वनपुरी, लक्ष्मण गायकवाड माजी सरपंच पारगाव, चेतन मेमाणे उपसरपंच पारगाव, विठ्ठल मेमाणे, विकास कुंभारकर उपसरपंच उदाची वाडी, स्वप्नाली होले सरपंच खानवडी, अमोल कामठे माजी सरपंच कुंभारवळण, सतीश कुंभारकर वनपुरी, अविनाश मेमाणे पोपट मेमाणे पारगाव आदी उपस्थित होते.