पुणे : फडणवीस सरकारने सुरू केलेली पण नंतरच्या ठाकरे सरकारने बंद केलेली जलयुक्त शिवार योजना शिंदे सरकार पुन्हा सुरू करणार आहे. या योजने या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे सांगून ठाकरे सरकारने योजनेची चौकशी लावून ही योजना बंद केली होती.
फडणवीस सरकारच्या या योजनेला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला होता. शिंदे सरकारने मात्र जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
काय आहे जलयुक्त शिवार योजना
-प्रत्येक गावात सरकार, एनजीओ आणि लोक सहभागातून नदी नाल्यातील गाळ काढून छोटे बंधारे बांधून पाणी अडवलं गेलं.
-अनेक वर्षांपासून लुप्त झालेल्या नद्यांचे पूनर्जीवन करण्यात आले.
-पावसाचे पाणी वाया न जाता जमीनीत मुरेल अशी व्यवस्था केली गेली.
-‘जलयुक्त शिवारमुळे १२५०० गावे कायमस्वरूपी टँकर मुक्त झाली.
-जलयुक्त शिवारामुळे १८००० गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला.
-टँकर माफिया राजला धक्का बसला.