नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून घेतला आहे. या हल्ल्यात भारताने दहशतवाद्यांची नऊ ठिकाणे उध्वस्त केली आहेत. या कारवाईत 95 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे. आता भारताचे ऑपरेशन सिंदूर चीनच्या चांगलंच जिव्हारी लागलं आहे.चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने भारताने केलेली लष्करी कारवाई दुर्दैवी असल्याचं म्हणत पाकिस्तानची बाजू घेतली आहे.
भारतीय लष्कराने थेट पाकिस्तानात आणि पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून केलेली कारवाई चीनच्याच्या जिव्हारी लागली आहे.ऑपरेशन सिंदूरवर बोलताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने पाकिस्तानची बाजू घेत ऑपरेशन सिंदूरमुळे सद्यस्थितीबाबत आम्ही चिंतेत आहोत असे म्हटले आहे. तसेच भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे शेजारी देश असून ते चीनचेही शेजारी आहेत असं म्हणतच चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करतो, असंही म्हटलं आहे.
दरम्यान दोन्ही देशांनी शांततेच्या दृष्टीने विचार करावा, संयम बाळगावा परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होईल असं कोणतंही पाऊल उचलू नये, असं आवाहान देखील दोन्ही देशांना चीनने केलं आहे.त्यामुळे सदैव दहशताद्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानवर कारवाई केल्यानंतर चीन नेहमीप्रमाणे पाकिस्तानला पाठीशी घालत आहे. याआधी दहशतवादावर कठोर कारवाई करण्याची भूमिका घेणाऱ्या अमेरिकेने देखील भारताने केलेल्या कारवाईवर ‘इट इज शेम’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.