नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाने (IAF) पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर “ऑपरेशन सिंदूर” अंतर्गत हल्ले करून पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. पहलगाममध्ये अलिकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे, ज्यामध्ये २६ निष्पाप लोकांचे प्राण गेले आहेत. भारत दहशतवादाविरुद्धच्या आपल्या भूमिकेवर कायम राहिला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाने केलेल्या अचूक हल्ल्यांमुळे दहशतवादी पायाभूत सुविधांना मोठा धक्का बसला. ही कारवाई अत्यंत अचूकतेने पार पाडण्यात आली. दरम्यान, पाकिस्तानशी थेट संवाद साधल्यानंतर युद्धबंदीचा करार केला असल्याचे वृत्त होते. दरम्यान, भारतीय हवाई दलाकडून एक मोठे विधान समोर आले आहे. भारतीय हवाई दलाचे म्हणणे आहे की, “ऑपरेशन सिंदूर” अजूनही सुरू आहे. एक्सवर माहिती देताना, भारतीय हवाई दलाने लिहिले की, ‘भारतीय हवाई दलाने (IAF) ऑपरेशन सिंदूरमध्ये नेमून दिलेली कामे अचूकता आणि व्यावसायिकतेने यशस्वीरित्या पार पाडली आहेत.
राष्ट्रीय उद्दिष्टांच्या अनुषंगाने हे ऑपरेशन विचारपूर्वक पार पाडण्यात आले. ऑपरेशन अजूनही सुरू असल्याने, योग्य वेळी सविस्तर माहिती दिली जाईल, असे भारतीय हवाई दलाने म्हंटले आहे. नागरिकांना शांत राहण्याचे आणि अफवांवर किंवा पडताळणी न केलेल्या माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
येथे पाहा पोस्ट:
The Indian Air Force (IAF) has successfully executed its assigned tasks in Operation Sindoor, with precision and professionalism. Operations were conducted in a deliberate and discreet manner, aligned with National Objectives.
Since the Operations are still ongoing, a detailed…
— Indian Air Force (@IAF_MCC) May 11, 2025
दिल्लीत पंतप्रधान मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांच्यात एक महत्वपूर्ण बैठक झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, भारत पुढे काय भूमिका घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.