Crime News: येथील कोटा येथून विचित्र घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. पीडित महिला गिरीजेश (३० वर्ष) गेल्या दोन महिन्यांपासून तिच्या माहेरी राहत होती. ती आजारी असल्याने तिला नुकतीच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. (Rajasthan Latest Crime News)

दरम्यान, तिचा पती खुशराज (३४ वर्ष) याने तिला फोन केला आणि डॉक्टरकडे घेऊन जातो असे सांगितले. त्यानंतर महिलेच्या वडिलांनी तिला कोटा येथे आणून सोडले. त्यानंतर ते गावी परतले. त्या रात्री पती खुशराज कामावरून घरी आल्यानंतर पत्नीला ज्यूस प्यायला जाऊ असे सांगितले आणि बाहेर घेऊन गेला.
हेही वाचा: एक्स-गर्लफ्रेंडची जबरदस्ती किस…; प्रेयसीन असा चावा घेतला की जीभच…
त्यानंतर आजूबाजूला कोणीही नसल्याचा फायदा घेत आरोपीने पतीने तिचा कान कापला. त्यानंतर पत्नीला तिथंच सोडून तो पोलीस ठाण्यात आला आणि पोलिसांना सांगितले की, “मी माझ्या पत्नीचा कान कापला आहे. आरोपी पतीला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, पती तिला एका निर्जन रस्त्यावर घेऊन गेला आणि अचानक तिच्यावर हल्ला केला. त्यानंतर त्याने तिला काटेरी झुडपात ढकलून दिले. धारदार चाकूने तिचा एक कान कापला. त्यानंतर तिचा तिथून पाळून गेला. त्यानंतर तो स्वतः महावीर नगर पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला आणि त्याने पोलिसांना सांगितले की त्याने त्याच्या पत्नीचा कान कापला आहे.
पोलिसांनी चौकशी चौकशी केली असता पतीने सांगितले की, त्याच्या पत्नी त्याच्यासोबत केलेलं दुसरे लग्न आहे. त्याला संशय होता की ती त्याला सोडून दुसऱ्या कोणासोबत तरी जात आहे. गेला काही काळापासून तिचे वर्तन त्याला बदललेले दिसत होते. “मी तिचा कान कापला जेणेकरून ती आता, दुसरे कोणीही तिच्याशी लग्न करू शकत नाही. ती माझ्यासोबत राहील,” असे पतीने पोलिसांना सांगितले.
हेही वाचा: पुण्यात एकाला लिफ्ट मागितली अन्…; घडलं भयंकर







