मुंबई: घरगुती वाद (Shocking News) कधी कधी किती भयंकर वळण घेऊ शकतो, याचं (Crime News) धक्कादायक उदाहरण मुंबईत समोर आलं आहे. बिर्याणीत मीठ (Mumbai Crime) जास्त झाल्याच्या शुल्लक कारणावरून (Mumbai News) पतीने स्वतःच्या पत्नीची हत्या केल्याची घटना मुंबईतील गोवंडी परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. (Latest Marathi News)

नवरा इंजिनिअर
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव मंजर इमाम हुसैन (वय 23) असून तो एका खासगी कंपनीत इंजिनियर म्हणून काम करत होता. मंजरचे लग्न नाझीया परवीन (वय 20) हिच्याशी झाले होते. नाझीया ही मूळची उत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथील रहिवासी होती. ती आपल्या कुटुंबातील सर्वात मोठी मुलगी होती. तिचे वडील सौदी अरेबियामध्ये नोकरी करत असून आई घरातच लहान भाऊ आणि बहिणीची जबाबदारी सांभाळत होती.
मिठावरून वाद
लग्नानंतर मंजर आणि नाझीया यांच्यात अनेकदा किरकोळ वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हे वाद कधीही गंभीर स्वरूपाचे नव्हते. शुक्रवारी 19 डिसेंबर रोजी रात्री नाझीयाने जेवणासाठी बिर्याणी बनवली होती. त्या बिर्याणीत मीठ जास्त झाल्याच्या कारणावरून मंजर आणि नाझिया यांच्यात जोरदार भांडण झाले.
पुण्यातील धक्कादायक प्रकार! ‘चल आपण खेळू’ म्हणत झाडीत नेलं अन् अल्पवयीन मुलासोबत केलं भयंकर कृत्य…
राग अनावर अन्..
हा वाद इतका वाढला की, रागाच्या भरात मंजरने नाझीयाचे डोके भिंतीवर जोरात आपटले. त्यामुळे नाझीयाला गंभीर दुखापत झाली. भांडणाचा मोठा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी घरात हस्तक्षेप केला. त्यांनी तातडीने नाझीयाला रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर नाझीयाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून नाझीयाचा पती मंजर इमाम हुसैन याला रविवारी 21 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून अधिक माहिती घेतली जात आहे.







