Farmer Certificate: देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी हा आधारस्तंभ मानला जातो. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अनेक सवली दिल्या जातात. कृषीशी संबंधित अनेक शासकीय योजना, अनुदानं आणि लाभ मिळवण्यासाठी शेतकरी असल्याचा अधिकृत दाखला आवश्यक ठरतो. मात्र, हा दाखला कसा मिळतो आणि कोणत्या निकषांवर दिला जातो, यासंदर्भात अनेक शेतकऱ्यांना अद्यापही स्पष्ट माहिती नसल्यामुळे काही वेळा अर्ज करताना अनेक अडचणी निर्माण होतात. तर चला जाणून घेऊ हा शेतकरी दाखला म्हणजे काय? (Farmer Certificate)
शेतकरी दाखला हा त्या व्यक्तीच्या नावावर शेतीची जमीन नोंद आहे किंवा ती व्यक्ती प्रत्यक्ष शेती करते, याचा सरकारकडून पुरावा असतो तो म्हणजे शेतकरी दाखला. हा दस्तऐवज संबंधित जिल्हा प्रशासनाकडून दिला जातो आणि अनेक महत्त्वाचा सरकारी योजनांसाठी तो अनिवार्य समजला जातो.
हेही वाचा- Justice Suryakant: न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी घेतली भारताचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ
शेतकरी दाखला मिळवण्यासाठी अर्जासाठी ‘या’ गोष्टी महत्त्वाच्या
शेतकरी दाखला मिळवण्यासाठी अर्जदाराने काही मूलभूत अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यात समाविष्ट आहेत;
- अर्जदाराच्या नावावर 7/12 उतारा, 8A उतारा किंवा शेतीचा नोंदणी दस्तऐवज असणे
- शेती वारसाहक्काने मिळाल्यास वंशावळीचा पुरावा
- प्रत्यक्ष पिक घेत असल्याचे प्रमाणपत्र (गरजेनुसार)
- जमीन भाडेपट्ट्यावर घेतली असल्यास वैध करारनामा
हा दाखला पुरुष आणि महिला दोघांनाही मिळून शकतो. अगदी 1.5 ते 2 गुंठे जमीन असली तरी पात्रता लागू होते. तसेच संयुक्त मालकीची जमीन असली तरीही हा दाखला मिळू शकतो.





