Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : चारचाकी गाडी चालवताना चालकाला अचानक डुलकी लागल्याने ताबा सुटून गाडी थेट पुलावरून खाली असलेल्या खोल खड्ड्यात जाऊन आदळली. रविवारी (ता. 03) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जेजुरी-उरुळी कांचन राज्य मार्गावर शिंदवणे जवळील राजेवाडी परिसरात हि घटना घडली. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गाडीचे नुकसान झाले आहे. Uruli Kanchan News
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. 03) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पिंपरी चिंचवड येथील कुटुंबीय एका इनोव्हा कारमधून जेजुरी-उरुळी कांचन मार्गावरून जात होते. राजेवाडी परिसरातील पुलावर गाडी आली असता, चालकाला अचानक डुलकी लागली. वेगात असलेली गाडी थेट पुलाचे कठडे तोडून खाली असलेल्या खड्ड्यात कोसळली. अपघाताचा आवाज ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. अपघातग्रस्त चारचाकीतील व्यक्तींची नावे अद्याप समजू शकली नाहीत. Uruli Kanchan News

गाडी खड्ड्यात अडकल्याने तिला बाहेर काढणे कठीण होते. अशा वेळी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील कुणाल काळभोर, शुभम काळभोर, अजिंक्य काळभोर, अर्जुन जंगले, श्रेयस वीरकर आणि संग्राम काळभोर व काही तरुण मदतीसाठी धावून आले. या तरुणांनी तातडीने हालचाल करून ट्रॅक्टरची व्यवस्था केली. Uruli Kanchan News
दरम्यान, या तरुणांनी जीवाची पर्वा न करता धाडसी कारवाई करत ट्रॅक्टरच्या साहाय्याने सदर चारचाकी गाडी खड्ड्यातून बाहेर काढली. मदतीसाठी पुढे आलेल्या लोणी काळभोरच्या तरुणांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. Uruli Kanchan News







