सागर घरत
करमाळा: करमाळा तालुक्यातील पश्चिम भागामध्ये मध्यरात्री अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. मोठ्या प्रमाणात कांदा, केळी अन्य पिकांचेही नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात झाडे ही उन्मळून पडली आहेत.