Sasvad News : सासवड, (पुणे) : पुरंदर तालुक्यातील बेलसर येथील ‘वाडा ॲग्रो मशरूम’ कंपनीत एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. कंपनीतील सांडपाण्याच्या ड्रेनेजची टाकी स्वच्छ करण्यासाठी उतरलेल्या तीन कामगारांचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला. रविवारी (ता. 26) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. Sasvad News

पिंटू राजेश प्रसाद (वय २३, रा. खोराराम, उत्तरप्रदेश), व्यास सोहम कुमार (वय २२, रा. नवतम) गौतम रामसूरन कुशवाहा (वय ३६, रा. मेदनापूर) अशी मृत तिघांची नावे आहेत. तिघेही उत्तरप्रदेश येथील असल्याची माहिती मिळत आहे. Sasvad News
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुरुवातीला एक कामगार स्वच्छतेसाठी टाकीत उतरला होता. मात्र, बराच वेळ झाला तरी तो बाहेर येत नसल्याचे पाहून दुसरा कामगार त्याला पाहण्यासाठी खाली उतरला. ते दोघेही वर येत नाहीत हे लक्षात आल्यावर तिसरा कामगारही टाकीत उतरला. दुर्दैवाने, टाकीतील साठलेल्या विषारी गॅसमुळे तिघेही जागीच बेशुद्ध पडले आणि त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. Sasvad News
बराच वेळ कोणीच बाहेर न आल्याने शेजारील नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने जेसीबीच्या साह्याने ड्रेनेजवरील सिमेंटचा स्लॅब फोडला आणि तिघांना बाहेर काढले. त्यांना तातडीने जेजुरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. Sasvad News
या घटनेनंतर औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. ड्रेनेज किंवा सांडपाण्याची टाकी स्वच्छ करताना आवश्यक असलेली सुरक्षा साधने या कामगारांकडे होती का? तसेच कंपनी प्रशासनाने योग्य खबरदारी घेतली होती का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. Sasvad News
याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृतदेहांचे शवविच्छेदन सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, यामध्ये कोणाचा निष्काळजीपणा आढळल्यास त्यावर कडक कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. Sasvad News







