पुणे : पुरंदर विमानतळ पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. प्रस्तावित पुरंदर विमानतळ प्रकल्प करण्याची प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे.याबाबत प्रकल्प बाधित गावांमध्ये विरोधाचा सूर वाढत चालला आहे. या विमानतळ प्रकल्पावरून शेतकरी आणि सरकारमध्ये संघर्ष पेटला असताना पुरंदर तालुक्यात विमानतळ होणारच आहे. सरकारची हीच भूमिका आहे,’ असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.
पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन करण्यात येणाऱ्या सात गावांतील जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांनीच सर्वांशी चर्चा करून, कशा पद्धतीने मोबादला हवा आहे, याचा प्रस्ताव येत्या सात दिवसांत सरकारला द्यावा. त्यावर मंत्रिमंडळात चर्चा करू,’ अशा शब्दांत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. कोणत्याही परिस्थितीत विमानतळ होणारच, असा राज्य सरकारचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितल आहे
दरम्यान पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांनी ऑफर द्यावी नाहीतर पुढील १५ दिवसांत सरकारकडून शेतकऱ्यांना चांगला मोबदला कशा स्वरूपात देता येईल, याचे पॅकेज जाहीर केले जाईल, असे संकेत बावनकुळे यांनी दिले आहेत.