पुणे- स्वप्नात वारंवार येत असलेले चोरटे खऱोखरच मारहान करतील या भितीने बारामती तालुक्यातील 28 वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार प्रत्यक्षात घडला आहे.
अक्षय सुरेश कदम (वय 28, रा. सुपा ता. बारामती) हे त्या आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असुन, अक्षय कदम याने शुक्रवारी (ता. 12) मध्यरात्रीच्या समारास ख्याला साडी बांधुन गळफास घेतल्याचे ऊघडकीस आले आहे. याबाबत अक्षयचा मावस भाऊ भाऊ शेखर शेलार याने दिलेल्या तक्रारीनुसार वडगाव निंबाळकर पोलिसात आत्महत्येचा गुन्हा दाखल कण्यात आला आहे.
वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कदम हा सुपा परीसरात मोलमजुरी करुन, कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मागिल कांही दिवसापासुन गावात फिरतांना, मित्रमंडळींना आपणास स्वप्न पडते व स्वप्नात येणारे चोर मला मारहाण करणार असल्याचे अक्षय सांगत होता. स्वप्नाबद्दल वारंवार सांगत असल्याने, त्याच्या मित्रमंडळींनी त्याला वेड्यात काढण्यास सुरुवात केली होती. दरम्यान गुरुवारी त्याने स्वप्नातील चोर मारहान करणा असल्याची कल्पना घरातील सदस्यांनाही दिली होती.
दरम्यान घरातील लोकांनी अक्षयची समजूत काढली होती. याच वाचारात शक्रवारी रात्री दहा वाजनेच्या सुमारास अक्षय घराची आतुन दारे खिडक्या बंद करून घऱात झोपण्यास गेला. शनिवारी सकाळी उशिरापर्यंत दार उघडली नाही त्यामुळे घऱातील सदस्यांनी आत डोकावून पाहिले असता, अक्षयने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. वडगाव निंबाळकर पोलिसांनी याबाबत अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.
याबाबत अधिक माहिती देतांना वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे म्हणाले, अक्षय कदम यांच्या मावस भावाने दिलेल्या तक्रारीनुसार अक्षयच्या मृत्युची नोंद अकस्मित मृत्यूची नोंद असी केली आहे. मात्र गावातील सरपंच, व कांही नागरीकांच्याकडे विचारणा केली असता, मागिल कांही दिवसापासुन अक्षय स्वप्नाबद्दल व चोरट्यांच्या मारहानीबद्दल बोलत होता. शुक्रवारी झोपण्यापुर्वीही दिल्याची माहिती मिळत आहे. याबाबत पुर्ण तपास केल्यानंतरच अक्षयच्या आत्महत्येचे नेमके कारण कळणार आहे.