मुंबई: आयपीएलच्या रणसंग्रामात वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सला त्यांच्याच बालेकिल्ल्यात धूळ चारल्यानंतर पंजाब किंग्जचा संघ उत्साहात आहे. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर. विजयानंतर बोलताना श्रेयसने केवळ संघाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे. मुंबईचा 195 चा आकडा पार करत पंजाबने 198 रन काढत विजय मिळवला.

एका वेळी मुंबई इंडियन्स सहज 200 धावांचा टप्पा ओलांडेल असे वाटत असताना अचानक सामन्याचे पारडे पंजाबच्या बाजूने झुकले. पॉवरप्लेनंतर चौकार-षटकार रोखण्यावर लक्ष केंद्रित करणे आणि ‘पुढचा विचार करण्याऐवजी जे सुरु आहे त्यावर लक्ष केंद्रित करत गोलंदाजी करणे, ही रणनिती यशस्वी ठरल्याचे त्याने सांगितले.
या विजयात सलामीवीर प्रभसिमरन सिंगच्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधले. श्रेयसने त्याचे विशेष कौतुक करताना म्हटले की, “प्रभसिमरन आता फक्त आक्रमक खेळाडू राहिला नसून, तो एक ‘मॅच फिनिशर’ म्हणून समोर आला आहे.” तरुण खेळाडूंमधील ही खेळी संघासाठी फायद्याचे ठरत आहे. प्रतिस्पर्धी कोण आहे यापेक्षा आपल्या रणनीतीवर ठाम राहण्याचा फायदा पंजाबला मिळतोय.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाबचा संघ आता अधिक शिस्तबद्ध वाटू लागला आहे. जर हीच लय कायम राहिली, तर यंदा पंजाब संघ नक्कीच जिंकू शकतो.







