मुंबई: मुंबई इंडियन्सच्या आयपीएलमधील निराशाजनक कामगिरीचा ठपका ठेवत, कर्णधार हार्दिक पांड्याने अखेर फ्रँचायझीची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सततचे पराभव आणि चाहत्यांकडून होत असलेल्या टीकेमुळे हार्दिक सध्या मोठ्या मानसिक तणावाखाली असल्याचे समजते. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, हार्दिकने स्वतःहून हा निर्णय घेतला असून टीम मॅनेजमेंटनेही त्याला संमती दर्शवली आहे.

हार्दिकने २०२४ मध्ये रोहित शर्माकडून मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्वीकारले होते. मात्र, त्याच्या नेतृत्वाखाली टीमला अपेक्षित यश मिळवता आले नाही. २०२४ मध्ये टीम सर्वात शेवटी, तर २०२६ मध्ये नवव्या क्रमांकावर राहिली. या सगळ्याचा परिणाम हार्दिकच्या मानसिक स्वास्थ्यावर झाला असून, तो पूर्णपणे थकल्याचेही बोलले जात आहे.

केवळ नेतृत्वातच नव्हे, तर वैयक्तिक खेळातही हार्दिक संघर्ष करताना दिसला. त्याने १० सामन्यांत २२.८९ च्या सरासरीने आणि १३८.२६ च्या स्ट्राईक रेटने केवळ २०६ धावा केल्या, तर गोलंदाजीतही त्याला फक्त ४ विकेट्स मिळवता आल्या. दरम्यान, हार्दिक दुसऱ्या टिम कडून खेळणार कि ब्रेक घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








