Pune News: पुण्यातील (Pune) खराळवाडी, गांधीनगर परिसरात पाणी पुरवठा (Water Supply) न झाल्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. पुण्यात अनेक ठिकाणी पाण्याच्या समस्या वाढल्या आहेत त्यामुळे नागरिक महापालिकेवर संताप व्यक्त करत आहेत. खराळवाडी आणि गांधीनगर परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहेत.

पिंपरी शहरात पाणीटंचाई टाळण्यासाठी दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असतो. दर शुक्रवारीप्रमाणे सकाळी ठरलेल्या वेळी पाणी यावे अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र, कोणतीही सूचना न देता झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे गांधीनगर परिसरातील रहिवाशांची सकाळ अक्षरशः पाण्यासाठी धावपळ करण्यात गेली. त्यामुळे नागरिकांनी आणखी संताप व्यक्त केला.
शहरातील खराळवाडी आणि गांधीनगर परिसरात दररोज पहाटे 5 वाजता पाणीपुरवठा केला जातो. 21 तारखेला पाणी पुरवठा योग्य वेळीस केला नव्हता, त्यामुळे नागरिकांना जवळच्या सोसायटीतून विठ्ठल-रखुमाई मंदिर परिसर आणि महिंद्रा मॉलजवळील बोअरवेलमधून पाणी आणावे लागले. काही कुटुंबांनी मिळून जणांचा गट तयार करून टँकरद्वारे पाणी खरेदी करावे लागले.
सुमारे 12 वाजता अखेर पाणीपुरवठा विभागाने नळाद्वारे पाणी सोडले. मात्र, तेव्हापर्यंत नियमित पाण्याची वेळ निघून गेल्याने अनेकांना पायपीट करूनच पाण्याची सोय करावी लागली. पाणी योग्य प्रमाणात आणि योग्य वेळीस पुरवठा करणे अशी नागरिकांनी विनंती केली.
हेही वाचा- Gold Rate Today: सोन्याच्या भावात आज घसरण! जाणून घ्या, आजचे नवीन दर






