उरुळी कांचन: राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी उरुळी कांचन (ता. हवेली) येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीच्या 17 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धा या किकबॉक्सिंग स्पोर्ट्स अँड मार्शल आर्ट असोसिएशन पुणे डिस्ट्रिक्ट यांच्या वतीने आणि किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने राजगुरुनगर येथे पार पडल्या.
या स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यातून 250 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये स्वामी विवेकानंद अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी एकूण 17 पदकांची कमाई करत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिकही मिळवले. तसेच या स्पर्धेत विजयी ठरलेले विद्यार्थी 26 ते 29 जून दरम्यान हिंजवडी येथील विठ्ठल लॉन्स येथे होणाऱ्या राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत सहभागी होणार आहेत. अशी माहिती स्वामी विवेकानंद अकॅडमीचे प्राचार्य सुमित दास यांनी दिली.

स्पर्धेतील विजेते विद्यार्थ्यांची नावे
सुवर्ण पदक विजेते:
आदिती अमोल महाडिक
आर्या सिद्धेश आढाव
अभिनव त्रिपुरारी भारद्वाज
रुद्र सचिन कलंत्रे
संस्कार दत्तात्रय डोके
विराज दीपक आतकिरे
ऋग्वेद दीपक चौधरी
रजत पदक विजेते:
सिद्धी अशोक ठुले
विश्व राहुल जवळकर
ध्रुव दिपक पाटील
यशराज बाबुराव थोरात
विराज दीपक आतकिरे
साक्षी दिपक थोरात
कास्य पदक विजेते:
सामी सय्यद
अलोक गणेश शितोळे
वरद बाबासाहेब ठुबे
आर्या प्रसाद कुंजीर
दरम्यान, या स्पर्धेतील स्पर्धकांना क्रीडा शिक्षक नागेश काळभोर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुरेश कांचन, पंडित कांचन, इंद्रभान धुमाळ, संभाजी कांचन, तसेच स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे सर्व ट्रस्टी मेंबर्स, शाळेचे प्राचार्य डॉ. सुमित दास व उपप्राचार्य बाबासाहेब ठुबे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच या यशाबद्दल परिसरात विद्यालयाचे व विद्यार्थींचे अभिनंदन केले जात आहे.







