युनूस तांबोळी

शिरूर: “साहेब, मुलानं परिक्षेत 20 पैकी 18 मार्क मिळवले होते. लय (Shirur News) हुशार होता माझा (Pune News) रोहन पण बिबट्याने माझ्या डोळ्या समोर त्याच्यावर झडप टाकली मी वाचवायला गेलो पण माझ्यावर देथील बिबट्या गुरगुरल… रक्त्याच्या उलट्या केल्या अन् त्यच्या मानकुटाला धरून बिबट्याने शेताकडे ओढीत नेऊन ठार केल. पोटचा गोळा नेला अन व्हत्याच नव्हत झाल. अशी घटना परत नको. एकच करा हा परिसर बिबटमुक्त करा. आता बिबट्या नको” डोळ्यातून अश्रुंच्या धारा अन बिबट्याच्या हल्ल्यात बळी ठरलेल्या ‘रोहन’ चे वडील विलास हे गयावया करत होते. यावर “घाबरू नका आपण गांभीर्याने मार्ग काढू आणि हा परिसर कायमस्वरूपी बिबटमुक्त करू” असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरूर तालुक्याच्या पिंपरखेड येथे ग्रामस्थांसमवेत या कुटूंबाचे सात्वंन करताना दिले.
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड व जांबूत येथे गेल्या वीस दिवसात बिबट्याच्या हल्ल्यात तीन बळी गेले. या कुटूंबाचे सांत्वन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. या वेळी आमदार शरद सोनवणे, माजी आमदार पोपटराव गावडे, माजी चेअरमन देवदत्त निकम, वनविभागाचे वरिष्ठ उपसंरक्षक प्रशांत खाडे, सहाय्यक उपसंरक्षक स्मिता राजहंस, शिवसेनेचे रमेश येवले, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, उपविभागीय अधिकारी पुनम आहिरे, पोलिस निरीक्षक संदिप केंजळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
गेल्या वीस दिवसात शिवन्या बोंबे ( वय- 5 वर्षे ) भागुबाई जाधव ( वय-70 वर्षे ) रोहन बोंबे ( वय 13 वर्षे ) यांचा बिबट हल्यात बळी गेला होता. त्यांच्या कुटूंबाचे सांत्वन करण्यासाठी उपमुख्यमंत्री येथे आले होते. उपमुख्यमंत्री यांनी या वेळी परिसराची व रोहन विलास बोबे यांच्या घराची पहाणी केली.
यावेळी शिंदे म्हणाले की, या परिसरात बिबट्याच्या हल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. दिवसा ढवळ्या या घटना घडू लागल्या आहेत. कुटूंबादेखत आपल्या मुलांवर बिबट हल्ले होत आहेत. कुटुंबांनी जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही गोष्ट गांभिर्याने घेत असून यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रशासन यांच्याशी चर्चा करणारआहे. या भागात पानंद रस्त्यांची गरज असून शेतकऱ्यांनी जागा दिली तर पुढील काळात रस्ते करणार. यासाठी मंत्री शिरसाट यांना या भागाचा दौरा करायला सांगू. यापुढे एकही बिबट हल्ला होणार नाही. याची काळजी घेतली जाईल. यासाठी हा परिसर कायम स्वरूपी बिबटमुक्त करणार. वनविभागाने सर्व यंत्रणा वापरून हा परिसर बिबट मुक्त करावा. असे आदेश दिले आहे.







