यवत, (पुणे) : एका मुक्या बकरीने पाठातील पाणी पिल्याचे कारणावरून वृद्ध मेंढपाळ कुटुंबावर लोखंडी रॉड, दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहान केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. रविवारी (ता.14) सायंकाळी साडेप्कॅह वाजण्याच्या सुमारास नानगाव (ता. दौंड) गावचे हद्दीतील कच्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात ही घटना घडली. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात नानगाव येथील संबंधित शेतमालक आणि तीन अनोळखीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र खळदकर (शेतमालक, पूर्ण नाव माहीत नाही) व तीन अनोळखी कामगार (नाव, पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत मारुती वाघू केसकर (वय-65, व्यवसाय- मेंढपाळ, सध्या रा. नानगाव, ता. दौंड, मूळ रा. देऊळगाव गाडा, ता. दौंड, जि. पुणे) यांनी याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता.14) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मारुती केसकर हे आपल्या बकऱ्या चरवून नानगाव गावच्या हद्दीतील राजेंद्र खळदकर यांच्या शेतातून जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावरून चालले होते. त्या वेळी त्यांच्या कळपातील एका बकरीने शेतमालक राजेंद्र खळदकर यांच्या शेतातील पाण्याच्या पाटात पडलेले पाणी प्यायले.
शेताच्या पाण्याचे पाठातील पाणी पिल्याचे कारणावरून फिर्यादीस, फिर्यादी यांची पत्नी व फिर्यादी यांचा मुलगा यांना शिवीगाळ दमदाटी करून हाताने लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच त्यांचे हातातील दगडाने व लोखंडी रॉडने मारहाण करून दुखापत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान मारुती वाघू केसकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वरील आरोपींवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार करे हे करत आहेत.







