पुणे: महाराष्ट्रातील घराघरांमध्ये सध्या एका अदृश्य संकटाने शिरकाव केला आहे. पोलीस आणि बालकल्याण विभागाच्या ताज्या आकडेवारीने एक धक्कादायक वास्तव समोर आणले आहे. राज्यात मुलांच्या तुलनेत अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे किंवा घर सोडून जाण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. विशेषतः पुणे, मुंबई, ठाणे आणि नाशिक यांसारख्या महानगरांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे.

बदललेली जीवनशैली आणि सोशल मीडिया हे प्रमुख कारण असून इन्स्टाग्राम रील्स आणि फेसबुकच्या आभासी जगात वावरताना अनेकदा अल्पवयीन मुली अनोळखी व्यक्तींच्या संपर्कात येतात. मोबाईलचा अतिवापर आणि पालकांशी होणारे किरकोळ वाद ही या आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत.
घर सोडून गेलेली मुलगी ती मानवी तस्करी किंवा लैंगिक शोषणासारख्या भयानक गुन्हेगारी जाळ्यात अडकण्याची दाट शक्यता असून एकदा या चक्रव्यूहात अडकल्यावर तिथून सुटका होणे अत्यंत कठीण होऊन जाते.







