पोपट पाचंगे

रांजणगाव गणपती: नीट परीक्षेत गैरव्यवहार आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना पाठींबा देण्यासाठी शिरुर तालुक्यातील विविध संघटनानी आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. शिरुर बाजार समिती येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन सर्व संघटना, महाविद्यालयीन विद्यार्थी,डॉक्टर, वकील व नागरिक यांचा मोर्चा शिरुर पोलिस ठाणे येथे पोहचल्यानंतर तिथे सभा घेण्यात आली..

या मोर्चात माजी आमदार ऍड अशोक पवार,उपनगराध्यक्ष मितेश गादिया,नगरसेविका डॉ.सुनीता पोटे,माजी नगरसेवक रविंद्र धनक, मुज्जफर कुरेशी,मंगेश खांडरे, आबिद शेख, रमेश गायकवाड, गणेश पठारे,ऍड विक्रम पाचंगे, विलास पोटे, डॉ.स्वप्नील भालेकर, डॉ.संदीप कोकरे, गीताराणी आढाव,वैशाली साखरे,सविता बोरुडे,प्रमोद गायकवाड, खुशाल गाडे,गौतम कर्डीले,अमोल चव्हाण, दादाभाऊ मलगुंडे,रमेश दसगुडे, संजय बारवकर,रामभाऊ झेंडे, रमेश गायकवाड आदिसह विद्यार्थी व नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.
माजी आमदार ऍड अशोक पवार यांनी दिल्ली येथील विद्यार्थ्यांच्या मोर्चावर झालेल्या लाठी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.लाठी हल्ल्यातील विद्यार्थ्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे.लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करणे चुकीचे आहे,केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे, असेही माजी आमदार ऍड पवार यांनी यावेळी सांगितले.
विविध परीक्षार्थी असंख्य विद्यार्थ्यांच्या पेपरफुटीमुळे स्वप्नांचा चुराडा यामुळे मोठा उद्रेक झाला असल्याचे डॉ.भालेकर यांनी सांगून भारतीय लोकशाही वाचविण्यासाठीच हे आंदोलन पुकारण्यात आल्याचे डॉ.भालेकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय,वंदे मातरम,भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद व नीट परीक्षा घोटाळ्यातील दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे’ या घोषणानी परिसर दणाणून गेला.
यावेळी राज्याचे माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला. विद्यार्थी हक्क बचाव कृती समितीचे अविनाश शिंदे यांनी प्रास्ताविक केले.पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.






