नारायणगाव : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला होता. सुसाट टेम्पोच्या धडकेत प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीमधील नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. अपघात करून घटनास्थळावरुन पळ काढलेल्या टेम्पोचालकाला पोलिसांनी अखेर चाकण परिसरातून अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पोचालक रोहितकुमार जगमालसिंग चौधरी (वय ३०, रा. मोहमदपूर जाट, ता. बावल, जि. रेवाडी, हरयाणा) हा अपघातानंतर पसार झाला होता. आता पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. एसटी बसचालकाने रस्त्यावर अयोग्यरित्या बस उभी केल्यामुळे भाऊसाहेब भास्कर जायभाये यालाही अटक करण्यात आली आहे. अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली आहे.
या प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी कि, आरोपी टेम्पोचालक चौधरी याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. एसटी बसचालक जायभाये यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. भरधाव टेम्पोने प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीला धडक दिली होती त्यात नऊ जनांचा मृत्यू झाला होता. दिल्याने झालेल्या भीषण अपघातात नऊ जण ठार झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव परिसरात घडली. या अपघातात आठ जण गंभीर जखमी झालेत तर नऊ जनांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली. अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पोचालकाला अटक करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलीस अधीक्षक देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे तपास शाखेच्या पोलिसांनी तपास करुन टेम्पोचालक रोहितकुमार चौधरीला चाकण परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत.
या प्रकरणातील आरोपीला अटक करून जुन्नर न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने आरोपी चौधरीला २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. एसटी बसचालक जायभाये यालाही अटक करुन न्यायलायात हजर करण्यात आले होते. जायभायला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.