बारामती: महानगरपालिका (Ajit Pawar) निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्याने राज्यातील राजकारण तापू (Baramati ZP Election) लागले आहे. या पार्श्वभूमीवर प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज मैदानात उतरले. मात्र प्रचाराच्या (Maharashtra Politics) शुभारंभाच्या कार्यक्रमातच त्यांनी दोन कार्यकर्त्यांच्या अनुपस्थितीवरून जाहीर नाराजी व्यक्त करत, कार्यकर्त्यांना थेट इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. (Latest Marathi News)

कार्यक्रमाला काही महत्त्वाचे कार्यकर्ते गैरहजर राहिल्याने अजित पवार चांगलेच संतापले. स्वतःसाठी पदं मिळवून घेणं आणि आईला नगरसेवक करून घेणं एवढ्यावरच काम संपत नाही, पक्षासाठी जबाबदारी घ्यावी लागते, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. “स्वतःचं काम झालं की संपलं असं समजू नका. उद्या येऊन दोघांना माझ्याकडे भेटायला सांगा. हे असं चालणार नाही,” असे शब्द वापरत त्यांनी संघटनात्मक शिस्तीवर भर दिला.
या भाषणात अजित पवार यांनी आपल्या राजकीय प्रवासाचाही उल्लेख केला. “मला साहेबांमुळे आणि राजीव गांधी यांच्यामुळे संधी मिळाली. त्यामुळे मी कधीच जातपात पाहिली नाही,” असे सांगत त्यांनी उमेदवार निवडीत वयोगटाला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट केले. यंदा 24 ते 55 वयोगटातील उमेदवार दिल्याने काही ज्येष्ठ कार्यकर्ते नाराज झाले असतील, हेही त्यांनी मान्य केले, मात्र आगामी काळात इतरांना संधी देण्याचे आश्वासन दिले.
विकासकामांचा पाढा वाचतानाच अजित पवार यांनी बारामती परिसरावर आपले विशेष लक्ष असल्याचे सांगितले. माळेगाव शिक्षण संस्थेसाठी 5 कोटींचा सीएसआर निधी, 394 कोटींचे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, 325 कोटींचे कॅन्सर हॉस्पिटल, 525 कोटींच्या पशुवैद्यकीय शिक्षणाच्या सुविधा आणि 94 कोटींची डॉग स्क्वॉड व्यवस्था यांचा त्यांनी उल्लेख केला. “माझा व्याप वाढला असला तरी माझं लक्ष इथेच आहे. मी हलक्या कानाचा नाही,” असे सांगत त्यांनी पक्षांतर्गत नाराजी आणि विरोधकांच्या हालचालींनाही उत्तर दिले.







