Missing Link : पुणे : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील महत्त्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प सुरू झाल्यानंतर प्रवासाचा वेळ कमी झाला असला, तरी आता या मार्गावर सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रकल्प सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच हा भाग ‘सेल्फी पॉइंट’ बनला असून अनेक वाहनचालक रस्त्यावरच गाड्या थांबवून फोटो आणि रील्स बनवत असल्याचे समोर आले आहे. Missing Link

या निष्काळजीपणामुळे अपघाताचा धोका वाढल्याने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) ने कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. मिसिंग लिंकवर वाहन थांबवणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असून यासाठी कृत्रिम प्रज्ञा (AI) आधारित यंत्रणांचा वापर करण्यात येत आहे. Missing Link
प्रकल्पाबद्दलचे आकर्षण लक्षात घेता अनेक वाहनचालक या मार्गावर थांबत असल्याचे दिसून आले. काही जण तर वाहतुकीच्या मध्यभागीच गाड्या उभ्या करून सेल्फी घेत असल्याने इतर वाहनांसाठी मोठा धोका निर्माण होत आहे. Missing Link
दरम्यान, एमएसआरडीसीने या मार्गासाठी वेगमर्यादाही निश्चित केली आहे. मोटारींसाठी ताशी १०० किमी, तर बससाठी ताशी ८० किमी अशी मर्यादा ठेवण्यात आली आहे. वेगमर्यादा ओलांडणाऱ्यांवरही कारवाई होणार आहे. सध्या या मार्गावर केवळ हलकी वाहने आणि बसना परवानगी असून जड वाहनांना ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश नाही. Missing Link
३० मिनिटांचा वेळ वाचणार
१३.३ किमी लांबीचा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प हा मुंबई–पुणे प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी उभारण्यात आला आहे. सह्याद्री पर्वतरांगांमधील खंडाळा घाटातील वाहतूक कोंडी टाळून हा मार्ग प्रवासाचा वेळ सुमारे अर्ध्या तासाने कमी करतो. Missing Link
या प्रकल्पात १०.६७ किमी लांबीचे पाच मार्गिकांचे दुहेरी बोगदे तयार करण्यात आले असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन आणि संबंधित यंत्रणांनी उभारलेला हा प्रकल्प वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. Missing Link
तथापि, वाढत्या बेफिकीर वर्तनामुळे या अत्याधुनिक मार्गावरच अपघाताचा धोका निर्माण होत असल्याने प्रशासनाने नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. Missing Link







